logo
vishweshwar Pathpedhi
English मराठी
  • आमच्या विषयी
    • इतिहास
    • पतपेढीची घोडदौड
    • सदस्य मंडळ
    • संस्थापक अध्यक्षांचे मनोगत
    • अध्यक्षांचा संदेश
    • पतपेढीपुढील आव्हाने व उदिष्टे
  • मुदत ठेव
    • बचत ठेव खाते
    • मुदत ठेव
    • आवर्त ठेव योजना
    • दैनंदिन बचत ठेव खाते
  • कर्ज योजना
    • गृह तारण कर्ज (स्थावर तारण कर्ज)
    • सोने तारण कर्ज
    • वैयक्तिक कर्ज
    • पगार कपात कर्ज
    • मुदत ठेव तारण कर्ज
    • उच्च शिक्षण कर्ज
    • व्यवसाय कर्ज (तारणी कर्ज)
    • तारणी कर्ज
    • विना तारणी कर्ज
    • तीन चाकी वाहन कर्ज
  • वार्षिक अहवाल
  • सामाजिक मदत
  • गॅलरी
  • बँक खाते तपशील
  • संपर्क साधा
banner3

संस्थापक अध्यक्षांचे मनोगत

letter

रौप्य महोत्सवी वर्षी संस्थापक अध्यक्ष श्री.नामदेव वि.कांदळगांवकार (मुख्य प्रवर्तक) यांचे मनोगत

मागे वळून पाहता...

ही गोष्ट आहे एका छोट्या बैठकीची! त्यातून जन्मलेल्या विश्वेश्वर सहकारी पतपेढीची!! १ जानेवारी १९६६ चा शुभदिवस,सकाळचे सात वाजले होते.एक छोटी बैठक भरली होती; ठिकाण होते लोअर परेल येथील खिमजी नागजी चाळ क्र.६, आणि खोली क्र.३६, हि छोटेखानी खोली म्हणजेच “तेली सेवा समाज” या संस्थेचे कार्यालय. आमंत्रित होते समाजातील निवडक कार्यकर्ते. विषय होता, एक पतपेढी स्थापन करण्याचा.खाजगी फंडांचा सुळसुळाट बंद करण्याचा.तळागळाच्या लोकांना आर्थिक हात पुढे करण्याचा.पठाणी व्याजाच्या गर्तेतून बाहेर काढण्याचा.शक्य झाल्यास सामान्यांचा विकास करण्याचा.सहकाराचा सुगंध दरवळविण्याचा.

बैठक तशी पूर्व नियोजित होती.वेळही पूर्व नियोजित होती.कोणत्याही बैठकीची सकाळची सातची वेळ ही ऐकायला अगदी चमत्कारीक वाटते.ती सुद्धा कडाक्याच्या थंडीच्या मोसमात.विस्तीर्ण मुंबईच्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्त्यांना ती आणखीनच अडचणीची.परंतु हि अवघड वेळ मुद्दामच निवडण्यात आली होती.त्यातून कार्यकर्त्यांची चिकाटी,कसोटी,अंगिकारलेल्या कामांची आत्मियता पहावयाची होती.त्यांची पारख घ्यायची होती. आनंदाची गोष्ट म्हणजे सर्व कार्यकर्ते पुरेपूर कसोटीला उतरले.सर्व श्री. यशवंतराव हरी आडिवरेकर, दत्ताराम रामचंद्र राणे, मुकुंद सखाराम कामतेकर, रघुनाथ गोविंद राणे, वसंत सिताराम कुरळकर,अर्जुन भागोजी मटकर,शांताराम गोविंद किंजवडेकर,यशवंत शंकर पावसकर,धोंडू अर्जुन तळावडेकर व मी स्वतः ठरल्या वेळेपूर्वीच हजर झालो.नव वर्षाच्या उगवत्या सूर्याला साक्षीला ठेवून सहकाराची ज्योत प्रज्वलीत केली.ती सतत तेवत ठेवण्याची शपथ घेण्यात आली.त्या साठी वाटेल त्या खस्ता खाण्याची,पादत्राने झिजवण्याची तयारी झाली.श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी स्थापन करण्याचे ठरले.उपस्थितांनी आपली वर्गणी तेथेच चुकती केली.सभासद नोंदणीचा “श्री गणेशा” झाला.देवाचे नाव असलेली पतपेढी रजिस्टर करण्याच्या दिशेने पाऊले उचलली गेली.

ध्येयपूर्तीचा निश्चय झाला! कार्यकर्त्यांनी पायाला भिंगऱ्या बांधल्या!!सभासद जमविण्याच्या कामास सुरवात झाली.पतपेढी रजिस्टर करणे ह्या व अनुषंगाने येणाऱ्या इतर सर्व गोष्टींची पूर्तता करणे या कामी श्री.शरदराव शेंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले रजिस्ट्रेशनसाठी सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात आली.१ फेब्रुवारी १९६६ रोजी १६६ सभासद व रु.२८८०/- भाग भांडवलनिशी पतपेढीच्या रजिस्ट्रेशनसाठी अर्ज केला. ६ मार्च १९६६ या शुभदिनी पतपेढी रजिस्टर झाली.”विश्वेश्वर कुटुंबाला” ६ मार्च हा ऐतिहासिक दिवस ठरला.जिद्द बाळगल्यास,योग्य दिशेने काम केल्यास,यश साध्य होणे कठीण नाही हे सिद्ध झाले.सभासद नोंदणी चालू होती. त्यानंतर सर्व श्री.भाई डिचोलकर,पांडुरंग पाटील,जगदीश चांदोस्कर,सदाशिव तेली इत्यादी अनेक कार्यकर्त्यांची भर पडली.उत्साह व्दिगुणीत झाला.नव्या जोमाने अधिक उत्साहाने पुन्हा कामास सुरुवात झाली.

सभासदांना बचत करण्यास उदयुक्त करणे आणि गरजेच्या वेळी कर्ज रूपाने मदत करणे, हे पतपेढीचे मुख्य उद्दिष्ट,बचत करण्याच्या कामास सुरवात झालेली होतीच,कर्ज मंजूर करण्याचे काम शिल्लक होते.म्हणजेच उत्पन्नाचे महत्वाचे अंग सुरु करणे बाकी होते.तेही तत्परतेने हाती घेण्याचे ठरले.कर्जासाठी अर्ज मागविण्यात आले.१० एप्रिल १९६६ रोजी प्रथमतः १४ सभासदांना प्रत्येकी २००/- प्रमाणे २,८००/-कर्ज मंजूर करण्यात आले.१२ एप्रिल १९६६ रोजी त्याचे वाटप करण्यात आले.अपेक्षापुर्ती दृष्टोतपत्तीस आली. सभासदांमध्ये विश्वास निर्माण झाला. नवीन सभासद आणणे, भागभांडवल उभारणे, कर्ज मंजूर करणे हि कामे नित्यनेमाची झाली. सभासद व कार्यकर्त्यांची कार्यालयात ये जा वाढली. कार्यालय सकाळ संध्याकाळ उघडू लागले. सुट्टी तर केव्हाच नाही. कार्यालय फुलून जाऊ लागले. चैतन्याचा झरा वाहू लागला.

सभासदांबरोबर गरजांची वाढ होऊ लागली,बचतीची नवीन योजनांची गरज निर्माण झाली.म्हणून कायम स्वरुपाची ठेव स्विकारण्याची योजना सुरु झाली.९ एप्रिल १९६७,सौ.जयश्री नामदेव कांदळगांवकर यांनी ५० रू.ची ठेव ठेवून मुदत ठेव खात्याचा शुभारंभ केला.त्या काळात ही ठेव आम्हास खरोखरच लाख मोलाची होती.

पतपेढीची आवक वाढली,कर्ज मागणीचे प्रमाणही वाढले.वेळप्रसंगी बँकेतून कर्ज घेऊनही सभासदांच्या गरजा भागवण्यात येत होत्या.भाग भांडवल व कर्ज यांची मर्यादा वाढविणे आणि बचतीची नवी दालने उपलब्ध करणे जरुरीचे भासले.सुरवातीचे रुपये ५०,०००/- चे भाग भांडवल सन १९७० मध्ये एक लाख,१९७१ मध्ये दोन लाख,१९७७ मध्ये पाच लाख,१९८० मध्ये दहा लाख,१९८७ मध्ये वीस लाख व १९९० मध्ये चाळीस लाखापर्यंत वाढविण्यात आले.भागभांडवलाची मर्यादा पूर्ण विचारांती टप्प्याप्प्यांने वाढविण्यात आली आहे.आज वसूल भाग भांडवलाने अठरा लाखाची मर्यादा ओलांडली आहे.

सुरवातीच्या वैयक्तिक कर्जाची मर्यादा फक्त रुपये ५००/- होती,ती सन १९७३ मध्ये १०००/-,१९७९ मध्ये २०००/-,१९८८ मध्ये ५,०००/- व १९९० मध्ये १०,०००/- पर्यंत वाढविण्यात आली.सभासदांच्या गरजा फक्त वैयक्तिक कर्जाने भागतात असे नाही.सभासदांचा विकास साधायचा असेल तर उत्पादक कार्यासाठी कर्ज देणे आवश्यक आहे.ह्याची उकल झाली म्हणूनच टँक्सी,रिक्षा तारण,छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगारात गुंतलेल्या व्यक्तीसाठी २५ ते ७० हजारांपर्यंत कर्ज देण्याच्या योजना आखण्यात आल्या. त्या कार्यान्वित करण्यात आल्या. आज विविध योजनांखाली दरमहा रु.३,००,०००/- च्या आसपास कर्ज दिले जाते आणि ते सुद्धा सभासदांच्या बचतीमधूनच.

सभासदांना बचतीची सवय लागणे,त्यांच्या गरजा भागतील इतपत कर्ज देणे व त्याची वेळेवर वसुली करणे ह्या तीन गोष्टी म्हणजे पतपेढीचा आत्मा आहे. जानेवारी १९८८ पासून आवर्त ठेव,दामदुप्पट ठेव व बचत खात्याच्या सुविधा सभासदांना उपलब्ध करून देण्यात आल्या. या सर्व योजनांना सभासद बंधूनी अपेक्षे पलिकडे उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी सभासद स्वतःच जागरूक आहेत.म्हणूनच गेल्या २५ वर्षात एकही कर्ज बुडीत काढण्याचा प्रसंग आलेला नाही,हे सांगण्यास आनंद वाटतो.

पतपेढीच्या या रथाचे घोडे चौखूर उधळतांना कधी ठेचाळले! अशा वेळी कार्यकर्ते भयभित झाले!! सामाजिक संस्था मध्ये जे होऊ नये ते झाले, असे सर्वांना वाटले. काही जणांना संस्थेशी असलेला सबंध नकोसा झाला.अशा वेळी संस्थेच्या नेतृत्वाची कसोटी लागली. झाल्या प्रकाराने ते नेतृत्व हतबल झाले नाही,तर नव्या जोमाने त्यांनी पाऊले उचलली.योग्य त्या कायदेशीर मार्गांचा अवलंब करून झालेले प्रकार सर्व सभासदांपुढे ठेवले.त्यांनी अशा प्रकारची कायदेशीर कारवाई तर केलीच परंतू पुन्हा नको ते प्रकार होऊ नये या करीता संस्थेच्या कार्यवाहित योग्य बदल करून संस्थेला नवा जोम दिला. त्याचं फलित म्हणून की काय, आजचा हा सोन्याचा दिवस आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पाहिला.

अदयाप पर्यंत जे केले ते खूप केले,असे म्हणता येणार नाही परंतु भविष्य काळात मात्र तरुण पिढीला खुप काही करणे बाकी आहे.विदयुत वेगाने पुढे जाणाऱ्या जगात आपल्या पतपेढीला बरेच काही करता येण्यासारखे आहे.त्यासाठी कार्यकर्तेही प्रयत्नशील आहेत. छोटया मोठया उद्योजक सभासदांसाठी ‘दैनंदिन बचत’ ’सुमंगल बचत’ ‘विदयावर्धिनी बचत’ अशा बचतीच्या विविध योजना सुरु करण्याचा मानस आहे. नवीन कर्जाच्या योजना ओघाने आल्याच. माल तारण कर्ज योजना,हप्ते बंद खरेदी इ.कर्जाच्या योजनाही आखण्यात येणार आहेत.

आज श्री विश्वेश्वर हे ४,५०० हून अधिक सभासदांचे कुटुंब आहे.याला उज्वल भवितव्य आहे.सहकाराची ज्योत तेवत ठेवण्याची प्रत्येकाची भावना आहे.एकमेकांचे सुख दु:ख जाणून घेण्याची इच्छा आहे.समाज सुखी व संपन्न करण्याची जिद्द आहे.त्यातूनच आपला उत्कर्ष साधता येणार आहे.आपले जीवन सहकारमय बनविता येईल;तेव्हाच एक मोठी बैठक भरविता येईल व श्रमाचे सार्थक होईल.
letter



                                                                             (श्री.नामदेव विठ्ठल कांदळगावकर)
                                                                             संस्थापक अध्यक्ष

letter
notice सभासदांसाठी सूचना
  • प्रत्येक सभासदाने पतसंस्थेच्या व्यवसायात थेट सहभाग घेऊन ‘क्रियाशील सभासद’असणे अनिवार्य आहे.किर्याशील सभासद होण्याकरिता मागील सलग ५ वर्षांपैकी किमान एका वर्षा-साठी ठेवी संदर्भात किमान रु.५०००/- किंवा त्याहून जास्त ठेव किंवा कर्ज सेवा संथ्येकडून घेतली असली पाहिजे.तसेच मागील सलग पाच वर्षांपैकी किमान दोन सर्व साधारण सभेस उपस्थित असले पाहिजे.तसेच सभासद थकबाकीदार असल्यास किंवा थकबाकीदार झालेल्या सभासदास जामीन असल्यास तो सभासद क्रियाशील सभासद म्हणून पात्र होऊ शकत नाही.
  • सभासदाने सहकार नियमाच्या ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार सहकारी संस्थेमध्ये सभासद होत असताना के.वाय.सी. फॉर्म भरून त्यासोबत पँनकार्ड,आधारकार्ड,रेशनकार्ड,नोकरी ओळखपत्र इ. कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती स्वतः साक्षांकित (self attestation) करून जोडणे आवश्यक आहे.त्या दृष्टीने सर्व सभासदांनी के.वाय.सी. फॉर्म पूर्तता करून संस्थेच्या कामामध्ये सहकार्य करावे.
  • प्रत्येक सभासदाने दिलेल्या राहण्याचा पत्ता, नोकरी व धंद्याचा पत्ता,whatsapp वरील नंबर, इमेल आय.डी., दुरध्वनी क्रमांक व कायदेशीर वारस इ.माहिती बदललेली असल्यास वेळच्या वेळी संस्थेला कळविणे आवश्यक आहे.
  • आपल्याला आपल्या दिलेल्या माहितीमध्ये बदल करावयाचे असल्यास वा नवीन माहिती देण्याकरीता आपल्या जवळच्या पतसंस्थेच्या शाखेत येऊन संपर्क करावा अथवा या वेबसाईट वरील ‘डाऊनलोड सेक्शन’ मध्ये जाऊन “KYC फॉर्म" डाऊनलोड करून आपली माहिती अद्ययावत करून त्यासोबत आपली कागदपत्रे स्वतः साक्षांकित (self-attestation) करून संस्थेच्या पत्तावर पाठवून द्यावी.
  • सभासदांनी बचत खात्यात रु.१,०००/-शिल्लक ठेवणे व भाग रक्कम किमान रु. १,०००/-करणे आवश्यक आहे.
  • वय वर्षे ६० पूर्ण केलेल्या जेष्ठ सभासदांना ठेवीवर ०.२५% अधिक व्याज दिले जाते.
  • सभासदांच्या मुदत ठेवीच्या पावतीची मुदत संपल्यानंतर त्यांनी त्या पावतीचे नुतनीकरण १४ दिवसांमध्ये करणे आवश्यक आहे. विशेष ठेवीमध्ये असलेल्या मुदत ठेव पावती नूतनीकरण करता येत नाहीत.
  • ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी पतसंस्थेच्या प्रत्येक शाखेच्या बँक खाते तपशीलासाठी या वेबसाईटच्या‘संपर्क साधा’ येथे क्लिक करावे.

डाउनलोड दस्तऐवज

  • ५९ वा वार्षिक अहवाल
  • केवायसि अर्ज

श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी मुंबई चा सभासद होण्याकरिता

वयाची १८ वर्षे पूर्ण झालेलाआणिकायम स्वरूपी मुंबईत वास्तव्यास किंवा कायमस्वरूपी नोकरी/व्यवसाय मुंबईत करणारा असावा.

वैयक्तिक सभासद होण्याकरिता लागणारी कागदपत्रे :
  • रेशन कार्ड
  • पॅनकार्ड
  • आधार कार्ड/ वीज बिल/ मतदान कार्ड
  • ३ पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो
  • नोकरी ओळखपत्र/ गुमास्ता परवाना

संस्थेचे खाते चालू करत असल्यास लागणारी कागदपत्रे :
  • संस्थेच्या पदाधिऱ्याच्या बैठकीत खाते चालू करणे व खाते चालविणारे संस्थेच्यापदाधिकाऱ्याची नावे मंजूर झालेल्या ठरावाचीप्रत
  • संस्थेचे पॅनकार्ड, संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र (रजिस्टे्शन सर्टिफिकेट)
  • खाते चालविणारे संस्थेच्यापदाधिकाऱ्याचे पॅनकार्ड,रेशन कार्ड,आधारका
*वरील कागदपत्रे स्वयं साक्षाकित करावे व सोबत मुळ कागदपत्रे सत्यापनासाठी घेऊन येणे.

अर्जदाराने खाते उघडताना भरावयाची रक्कम खालीलप्रमाणे
भाग १०००/-
बचत खाते १०००/-
प्रवेश व इतर खर्च ३०/-(जी.एस.टी. सामावेषक)
एकुण खर्च २०३०/-

कर्ज व्याजदर

कर्जाचा प्रकार कमाल कर्ज मर्यादा कर्ज व्याजदर कर्ज कालावधी
गृह तारण कर्ज (स्थावर तारण कर्ज) ५०००००० १०% २४० महिने
सोने तारण कर्ज ५००००० १०% १२ महिने
वैयक्तिक कर्ज १००००० ११% ३६ महिने
पगार कपात कर्ज १००००० १०% ३६ महिन
उच्च शिक्षण कर्ज ७५०००० १०% ६० महिने
व्यवसाय कर्ज (तारणी कर्ज) १०००००० १२% ८४ महिने
तारणी कर्ज ५०००००० १०% २४० महिने
विना तारणी कर्ज ५००००० १४% ६० महिने
तीन चाकी वाहन कर्ज १५०००० १३% ३६ महिने
ठेव तारण कर्ज ठेव रक्कमेच्या ८५% ठेव व्याजदराच्या २% अधिक ठेव अंतिम दिनांकापर्यंत

मुदत ठेव

ठेवीचा कालावधी व्याजदर जेष्ठ नागरिक
४५ दिवस ते ९० दिवस ४.००% ४.२५%
९१ दिवस ते १८० दिवस ४.५०% ४.७५%
१८१ दिवस ते ३६४ दिवस ५.००% ५.२५%
१२ महिने ते २४ महिने ५.५०% ५.७५%
२५ महिन्याच्यावर ५.२५% ५.५०%

आमच्या विषयी
इतिहास
पतपेढीची घोडदौड
सदस्य मंडळ
अध्यक्षांचा संदेश
पतपेढी पुढील आव्हाने

ठेव योजना
बचत ठेव खाते मुदत ठेव
आवर्त ठेव योजना
दैनंदिन बचत ठेव खाते

कर्ज योजना
गृह तारण कर्ज (स्थावर तारण कर्ज)
सोने तारण कर्ज
वैयक्तिक कर्ज
पगार कपात कर्ज
मुदत ठेव तारण कर्ज
उच्च शिक्षण कर्ज
व्यवसाय कर्ज (तारणी कर्ज)
तारणी कर्ज
विना तारणी कर्ज
तीन चाकी वाहन कर्ज

वार्षिक अहवाल
सामाजिक मदत
गॅलरी
संपर्क साधा

आमचे अनुसरण करा social media

सर्व अधिकार © श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित, सर्व अधिकार आरक्षित आहेत. Web Design Company मास्टर कॉम्प्युटेक